Adhik Maas Rituals: अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. यंदा हा मास १७ मेपासून सुरू झाला आहे. या काळात जावयाची पूजा करून त्याला वाण दिले जाते. मात्र या परंपरेमागील धार्मिक कारण अनेकांना माहीत नसते. चला तर आजच्या या लेखातून ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.
अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. यंदा अधिक मास हा १७ मे २०२६ पासून सुरू झाला आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा काळ “पुरषोत्तम मास” म्हणून ओळखला जातो.
अधिक मसाला पूर्वी “मलमास” असेही म्हटले जात असे आणि तो अशुभ मानला जात असे. मात्र नंतर भगवान विष्णूंना या महिन्याचा स्वीकार केला आणि त्याला “पुरषोत्तम मास” असे नाव मिळाले. त्यामुळे या महिन्यात विष्णू उपासनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
पुरुषोत्तम मास का म्हणतात?
असे मानले जाते की अधिक मास हा सुरुवातीला कोणत्याही देवतेच्या अधिपत्याखाली नव्हता, त्यामुळे तो उपेक्षित होता. त्यानंतर भगवान विष्णूंना त्याला आपले नाव देत “पुरषोत्तम मास” म्हणून मान्यता दिली. म्हणूनच या काळात विष्णू पूजन, व्रत आणि दानधर्मांचे विशेष महत्व सांगितले जाते.
अधिक महिन्यात जावयाची पूजा का केली जाते?
या महिन्यात जावयाला विष्णू स्वरूप मानले जाते. हिंदू परंपरेनुसार कन्यादानाचे वेळी असा संकल्प केला जातो की कन्या ही लक्ष्मी स्वरूप असून तिचा स्वीकार करणारा वर(जावई) हा प्रत्यक्ष विष्णू स्वरूप मानला जातो.
म्हणूनच अधिक महिन्यात जावयाची पूजा करून त्याला वाण देण्याची प्रथा आहे. जावयाचा सन्मान करणे म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूंची पूजा केल्यासारखे मानले जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
या काळात जावयाला विविध प्रकारच्या वस्तूंचे दान दिले जाते. विशेषतः छिद्र असलेल्या ३३ वस्तूंचे दान करण्याची परंपरा सांगितले जाते. यामध्ये बत्तासे, अनारसे यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. हे दान शुभ आणि पुण्यकारक मानले जाते.
अशा प्रकारे अधिक मासात जावयाचा सन्मान, पूजन आणि वाण देण्यामागे धार्मिक श्रद्धा आणि भगवान विष्णूंची उपासना हे मुख्य कारण मानले जाते.











