Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • विराट कोहलीचा मोठा निर्णय; ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी संपत्ती केली भावाच्या नावावर
क्रीडा

विराट कोहलीचा मोठा निर्णय; ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी संपत्ती केली भावाच्या नावावर

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहली नेहमीच मैदानावरल्या कामगिरीसाठी चर्चेत असतो, पण यावेळी चर्चा त्याच्या वैयक्तिक निर्णयामुळं सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्याआधी विराटनं गुरुग्राममधील आपली आलिशान मालमत्ता मोठ्या भावाच्या नावावर केली आहे. 14 ऑक्टोबरला वझिराबाद तहसील कार्यालयात विराटनं सर्व कागदपत्रांवर स्वाक्षरी करुन विकास कोहलीला जनरल पॉवर ऑफ अटर्नी (GPA) दिला. या निर्णयामुळं भावाला गुरुग्राममधील संपत्तीवर सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर हक्क मिळाले आहेत, जे आता त्याचं व्यवस्थापन करेल. या काळात कार्यालयात चाहत्यांची मोठी गर्दी होती, ज्यांनी विराटसोबत फोटो आणि सेल्फी काढल्या.

भारतातील मालमत्तेची जबाबदारी भावाला : विराट सध्या पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह लंडनमध्ये अधिक काळ घालवत आहे. त्यामुळं भारतातील मालमत्तांचं व्यवस्थापन करणं त्याच्यासाठी कठीण झालं होतं. या पार्श्वभूमीवर त्यानं भावावर विश्वास ठेवून सर्व कायदेशीर जबाबदाऱ्या सुपूर्द केल्या. GPA द्वारे विकास कोहलीला घरांच्या देखभालीपासून प्रशासनापर्यंत सर्व कामकाज हाताळण्याचा अधिकार दिला गेला आहे. या निर्णयामुळं विराट आपला मार्ग मोकळा करून क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करु शकेल.

80 कोटींच्या आलिशान बंगला :

विराट कोहलीचा गुरुग्राममधील डीएलएफ फेज 1 येथील बंगला अंदाजे 80 कोटींचा आहे. या बंगल्यात सुमारे 10 हजार चौरस फूट क्षेत्रफळ आहे, ज्यामध्ये स्विमिंग पूल, भव्य बार एरिया आणि आकर्षक इंटिरियरसह लक्झरी सुविधा आहेत. या घरात सध्या कोहलीची आई आणि इतर कुटुंबीय राहतात. याशिवाय त्याच्याकडे गुरुग्राममध्ये आणखी एक आलिशान फ्लॅट असून, एकूण मालमत्तेची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. आता या संपत्तीचे व्यवस्थापन विकास कोहलीच्या हातात राहणार आहे.

क्रिकेटच्या मैदानापूर्वी पार पाडली घरगुती जबाबदारी :

विराट सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियात भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत परत आला आहे. मैदानावरील परफॉर्मन्ससाठी तयारी करत असताना त्यानं घरगुती जबाबदाऱ्या पूर्वीच भावाला सुपूर्द करुन आपला मार्ग मोकळा केला. त्यामुळं आता विराट पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करु शकतो. या निर्णयामुळं चाहत्यांमध्ये आणि मीडिया मध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

संपत्ती आणि करिअर यांचं संतुलन :

विराट कोहलीचा हा निर्णय केवळ घरगुती व्यवस्थापनापुरता मर्यादित नाही; तो त्याच्या जीवनशैलीतील बदल आणि देशाबाहेरील वास्तव्याचं प्रतिबिंबही आहे. लंडनमध्ये राहून क्रिकेट आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या संतुलित करणं हा विराटसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. आता चाहत्यांची उत्सुकता या मालिकेतील त्याच्या कामगिरीसोबतच या वैयक्तिक निर्णयावरही लक्ष ठेवतेय, आणि पुढील काही महिन्यांत विराट कोहलीच्या कारकिर्दीत तसंच जीवनशैलीत काय बदल दिसतात, हे पाहणं मनोरंजक ठरेल.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts