Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • नितीश कुमारांनी दिला विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा; मुख्यमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह? राजकीय गणितं बदलणार?
Top News

नितीश कुमारांनी दिला विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा; मुख्यमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह? राजकीय गणितं बदलणार?

Nitish Kumar Resignation | बिहारच्या (Bihar) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी आज बिहार विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांना राज्य विधिमंडळातील आपल्या जागेचा त्याग करावा लागला आहे. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – शिवतीर्थावर गुप्त बैठक! पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार?

नितीश कुमार यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर जरी नितीश कुमार यांनी राजीनामा दिला असला तरी तांत्रिकदृष्ट्या ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. कारण भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार, जर एखादी व्यक्ती राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसेल तरीही ती व्यक्ती सहा महिन्यांपर्यंत मुख्यमंत्रीपद किंवा अन्य कोणतेही मंत्रीपद भूषवू शकते. त्यामुळे नितीश कुमार यांनी जरी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी ते सहा महिन्यांपर्यंत मुख्यमंत्रीपद भूषवू शकतात.

एकिकडे नितीश कुमार यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे तर दुसरीकडे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नितीन नवीन यांचीही राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा सादर करत नितीन नवीन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “मागील 20 वर्षांपासून मी बिहारच्या विकासासाठी आणि माझ्या मतदारसंघासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभाग घेता आला”, असं नितीन नवीन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये नितीश कुमार आणि नितीन नवीन हे दोन्ही नेते नवीन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात शपथ घेतील. त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा कोण असणार? आणि मंत्रिमंडळात काय नवीन फेरबदल होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts