Sunetra Pawar BJP CM Claim : अजितदादांचा अपघात (Ajit Pawar’s Accident) झाला आणि राज्यानं एक खमक्या नेता गमावला, आपला दादा…आपला कामाचा माणूस गमावला, आपल्या सगळ्यांना माहितेय, अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची किती तीव्र इच्छा होती. अनेकदांनी त्यांनी तसं उघडपणे बोलूनही दाखवलं होतं, मात्र एक अपघात झाला आणि त्याचसोबत अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नही अधुरं राहून गेलं, मात्र दादानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार का? आणि भाजपा सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री (Sunetra Pawar will become CM) करणार का? या चर्चेला आता चांगलीच फोडणी आलीय, यावर आता राजकीय प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनीही या विषयावर आपला डेली डोस भाजपाला दिलाय. सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास तो ‘भाजपाचा (BJP) मोठेपणा’ ठरेल, असा खोचक टोला महायुतीला लगावलाय…पण राऊतांनी नेमकं असं का म्हटलंय? आणि या चर्चा नेमक्या का सुरू आहेत?
हेही वाचा – राजकीय हस्तक्षेपावरून नवा वाद; सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?
राजकारणात सध्या एका नव्या चर्चेने जोर
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या चर्चेने जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राजकीय पोकळीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत सुनेत्रा पवार उमेदवार म्हणून रिंगणात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना ‘मुख्यमंत्री’ म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना भाजपावर निशाणा साधला असून, “जर भाजपाने सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केले, तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा असेल,” असे विधान केले आहे.
सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करून ‘मोठेपणा’ सिद्ध करा
संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीमधील अंतर्गत समीकरणांवर भाष्य केले. ते म्हणाले की, “अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींनी ज्या धैर्याने पक्ष सावरला आहे, ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या पक्षातील आमदारांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे की त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे. आता चेंडू भाजपाच्या कोर्टात आहे. जर देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेतृत्व खरोखरच मित्रपक्षांचा आदर करत असेल, तर त्यांनी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करून आपला ‘मोठेपणा’ सिद्ध करावा. मात्र, भाजपा केवळ निवडणुका जिंकण्यासाठी मित्रपक्षांचा वापर करतो, हे महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे.” राऊत पुढे म्हणाले की, “भाजपाला जर खरोखरच सुनेत्रा पवारांना मोठे करायचे असेल, तर त्यांनी केवळ शब्दांची फुलोरे न मांडता कृतीतून दाखवून द्यावे. बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देणे हा राजकारणाचा भाग झाला, पण राज्याचे सर्वोच्च पद देऊन सन्मान करणे हा खरा ‘मोठेपणा’ ठरेल.”
राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे अजितदादांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते,
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत उघडपणे बोलले जात आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर सभांमधून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचे समर्थन केले आहे. “अजितदादांचे स्वप्न राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे होते. ते स्वप्न अपूर्ण राहिले असले, तरी सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून ते पूर्ण होऊ शकते,” असे भावनिक आवाहन कार्यकर्त्यांना केले जात आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या अनुभवाचा फायदा राज्याला व्हावा आणि एका महिलेला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असा सूर राष्ट्रवादीच्या गोटात आहे.
फडणवीस यांची ‘मोठ्या भावाप्रमाणे’ खंबीर साथ
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी भाजपा आपली संपूर्ण ताकद पणाला लावेल. फडणवीस यांनी त्यांना ‘मोठ्या भावाप्रमाणे’ खंबीर साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न हा निवडणुकीनंतरच्या जागावाटपावर आणि संख्याबळावर अवलंबून असतो, असे भाजपाचे मत आहे. “आम्ही मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो, हे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे ‘मोठेपणा’ दाखवण्याचे प्रमाणपत्र आम्हाला राऊतांकडून घेण्याची गरज नाही,” असे प्रत्युत्तर भाजपा प्रवक्त्यांनी दिले आहे.
भाजपकडून निवडणुकीपुरता सुनेत्रा पवारांचा वापर
सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा अचानक सुरू होण्यामागे २३ एप्रिल रोजी होणारी बारामती विधानसभा पोटनिवडणूक हे प्रमुख कारण मानले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध अपक्ष असा सामना आहे. संजय राऊत यांनी आपल्या विधानातून बारामतीच्या मतदारांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, भाजपा केवळ निवडणुकीपुरता सुनेत्रा पवारांचा वापर करत आहे. जर भाजपाला खरोखरच आदर द्यायचा असेल तर त्यांना मुख्यमंत्री करावे, अन्यथा हा केवळ मतांसाठी केलेला बनाव आहे, असा राऊतांचा दावा आहे.
राजकीय चेंडू आता भाजप कशा प्रकारे परतवून लावणार
राजकीय विश्लेषकांच्या मते, संजय राऊत यांचे हे विधान दुहेरी हेतूने प्रेरित आहे. सुनेत्रा पवारांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करून एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात अस्वस्थता निर्माण करणे, बारामतीतील मतदारांना हे पटवून देणे की भाजपा सुनेत्रा पवारांना कधीही मोठे पद देणार नाही. सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेली ही चर्चा आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. संजय राऊतांनी ‘भाजपाचा मोठेपणा’ काढत टाकलेला हा राजकीय चेंडू आता महायुती कशा प्रकारे परतवून लावते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्राच्या इतिहासात अद्याप एकाही महिलेला मुख्यमंत्रीपद भूषवता आलेले नाही; जर हे घडले तर तो खरोखरच ऐतिहासिक निर्णय ठरेल.












