Indian Students Studying Abroad : चांगले शिक्षण, आधुनिक अभ्यासक्रम, जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश, संशोधनाच्या संधी आणि शिक्षणानंतर नोकरीची शक्यता यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशाची वाट धरतात. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि आता जर्मनीसह युरोपातील देश भारतीय विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय पर्याय ठरले आहेत. मात्र या वाढत्या परदेशी शिक्षणाच्या प्रवाहाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि कुशल मनुष्यबळावर नेमका काय परिणाम होतो, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे.
भारतीय विद्यार्थी परदेशात का जातात? ( Indian Students Studying Abroad )
भारतातील काही विद्यार्थ्यांच्या मते परदेशातील विद्यापीठांमध्ये विशिष्ट अभ्यासक्रम, संशोधन सुविधा, उद्योगांशी जोडलेले शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय exposure मिळते. शिक्षणानंतर त्या देशात काम करण्याची संधी मिळू शकते, हा देखील अनेक कुटुंबांच्या निर्णयातील महत्त्वाचा घटक आहे.
NITI Aayogच्या अहवालानुसार 2024 मध्ये 13.35 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत होते. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे प्रमुख destination countries होते.
मग भारताचे नुकसान होते का?
एकीकडे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी परदेशात गेल्याने भारतातून मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर जातो. Economic Survey 2025-26 नुसार 2024 मध्ये प्रत्येक 1 foreign student भारतात येत असताना 28 भारतीय विद्यार्थी परदेशात जात होते. परदेशी शिक्षणासाठी होणारा annual outward remittance देखील मोठा आहे.
दुसरीकडे परदेशात शिक्षण घेऊन काही विद्यार्थी भारतात परततात, व्यवसाय सुरू करतात किंवा संशोधन आणि उद्योग क्षेत्रात योगदान देतात. परदेशात स्थायिक झालेले भारतीय देखील भारतात पैसे पाठवतात. त्यामुळे हा विषय केवळ Brain Drain म्हणून पाहणे योग्य नाही.
हेही वाचा : ठाण्यात राज ठाकरेंची फटकेबाजी; गणपतीतील DJपासून बेरोजगारीपर्यंत, नेमकं काय म्हणाले?
Brain Drain म्हणजे नेमकं काय?
उच्च शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी परदेशातच नोकरी किंवा व्यवसाय करू लागला आणि त्याचे कौशल्य भारताला थेट मिळाले नाही, तर त्याला Brain Drain म्हणजेच कुशल मनुष्यबळाचे स्थलांतर असे म्हणता येते.
विशेषतः डॉक्टर, इंजिनिअर, AI तज्ज्ञ, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल तरुण मोठ्या प्रमाणावर परदेशात गेल्यास देशातील काही क्षेत्रांना मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते. 2026 मधील चर्चांमध्ये AI आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील talent retention हा देखील महत्त्वाचा मुद्दा म्हणून पुढे आला आहे.
मात्र आता परदेशात जाण्याचा ट्रेंड बदलतोय? ( Indian Students Abroad )
हो. गेल्या दोन वर्षांत परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. 2023 मध्ये 8.94 लाखांहून अधिक भारतीय शिक्षणासाठी बाहेर गेले होते; 2025 मध्ये ही संख्या 6.19 लाखांवर आली. वाढता खर्च, कडक visa नियम आणि immigration policies यामुळे अनेक विद्यार्थी आणि कुटुंबे पुन्हा विचार करू लागली आहेत.
ताज्या एका सर्वेक्षणात परदेशात शिक्षणाचा विचार केलेल्या भारतीय Gen Z पैकी 48% विद्यार्थ्यांनी मागील वर्षभरात आपली इच्छा कमी झाल्याचे सांगितले. वाढता खर्च हा प्रमुख अडथळा असल्याचेही सर्वेक्षणात दिसले.
भारतासाठी पुढचा मार्ग काय? ( Study Abroad India)
भारतातच जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन सुविधा, industry-oriented courses आणि चांगल्या रोजगाराच्या संधी वाढल्या तर विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते.
याच दिशेने foreign universitiesचे भारतातील campuses हा देखील एक पर्याय म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे भविष्यात “परदेशात जाऊन शिक्षण” याऐवजी “भारतात राहून जागतिक दर्जाचे शिक्षण” हा पर्याय अधिक मजबूत होऊ शकतो.





