IPL 2026 : आयपीएल 2026 चा रोमांच शिखरावर असताना आकाश चोप्रा यांनी खेळ अधिक रोमांचक करण्यासाठी काही नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या मते असे बदल झाले तर क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल दिसू शकतात. आयपीएलमध्ये अनेकदा फलंदाज गोलंदाजांवर भारी पडताना दिसतात. पाटा पिचमुळे फलंदाज चौकार-षटकारांचा पाऊस पाडतात, पण खेळात संतुलन आणण्यासाठी आकाश चोप्रा यांनी बीसीसीआयला महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
आकाश चोप्राचा पहिला सल्ला
आयपीएलमध्ये आकाश चोप्रा यांचा मोठा बदल असा आहे की, जर एखाद्या गोलंदाजाने 3 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या तर त्याला एक अतिरिक्त ओव्हर मिळावा. सध्या टी20 क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला जास्तीत जास्त 4 ओव्हर टाकता येतात, पण या सल्ल्यानुसार 3 विकेट घेतल्यास गोलंदाजाला पाचवा ओव्हर टाकण्याची परवानगी मिळावी.
आकाश चोप्राचा दुसरा सल्ला
आकाश चोप्रा यांच्या मते, आयपीएल लीग स्टेजमध्ये जर एखाद्या टीमने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर त्यांना अतिरिक्त पॉइंट मिळावा. जर एखादी टीम 15-16 ओव्हरमध्ये सामना जिंकते किंवा 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी सामना जिंकते, तर त्यांना 2 ऐवजी 3 पॉइंट देण्यात यावेत.
आकाश चोप्राचा तिसरा सल्ला
तिसरा सल्ला असा आहे की, जर एखाद्या फलंदाजाने 100 मीटरचा षटकार मारला तर त्याच्या टीमला 6 ऐवजी 8 धावा मिळाव्यात. त्यांच्या मते, मोठा षटकार मारण्याच्या प्रयत्नात खेळाडू बादही होऊ शकतात, त्यामुळे सामना अधिक रोमांचक होईल.आकाश चोप्राचे हे तिन्ही सल्ले खूपच रोमांचक आहेत. जर बीसीसीआयने यांचा विचार केला, तर आयपीएलमध्ये नक्कीच मोठे आणि आकर्षक बदल पाहायला मिळू शकतात.
रोहित शर्माने याआधी केली होती मागणी
भारताचा सुप्रसिद्ध फलन्दाज रोहित शर्मा याने देखील काही वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना असेच वक्तव्य केले होते ज्यात मोठ्या अंतराचा षट्कारला ८ धाव देण्याची मसागणी करण्यात आली होती. यामुळे या नव्या नियमबाबत परत एकदा चर्चाना उधन आलेले असून खरंच या नियमात बदल होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












