“घरी बसून कोणी मतदान करणार नाही. यासाठी रस्त्यावर उतरून वातावरण तयार करा. कोणी स्वत:ला बाहुबली समजत असेल तर, आम्ही अशा अनेक बाहुबलींना निवडून आणलेलं आहे,” अस वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता या चर्चा सुरू झाल्या आहेत. नुकताचं बिहार विधानसभेचा निकाल हाती आला आहे आणि भाजपच्या डोक्यात विजयाची हवा गेली असल्याने त्यांनी असे विधान केल्याचे बोललं जात आहेत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजप नेत्यांना तर इशारा देण्याचा प्रकारन नाही ना? अशा चर्चा सध्या राज्यात रंगत आहेत.
निवडणुकीसाठी पैसे लगातत. आपण महायुतीत असलो तरी, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पैशांच्या पुढे कुणी म्हणत असेल की मी निवडून आलोच तर असं होत नाही. आपण सक्षम आहोत, इतरांना आपली चिंता करावी लागेल. समझनेवालो को इशारा काफी है, असं वक्तव्य भंडार्यात पक्षाच्या कार्यक्रमात प्रफुल पटेल यांनी केलं आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे.
हेही वाचा – “आपल्या जिभेवर आणि विधानांवर ताबा ठेवा..” भाजप खासदाराला थेट धमकी..
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक महायुती स्वबळावर लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे. काही काही ठिकाणी जमल्यास महायुतीमध्ये अलायन्स होऊ शकते. पण, महायूतीच्या तिन्ही पक्षाने निर्णय केलेला आहे, सगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात. 9 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप मोठी गर्दी असते. तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. त्यासोबतच स्थानिक स्तरावर काही वेगवेगळी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे तिथला निर्णय तिथेच घ्यावं लागते. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहे. एखाद ठिकाणी कुठे तडजोड करायचा प्रसंग आल्यास आम्ही तसं तडजोड करू, असं माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.
आज भंडारा येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान नगराध्यक्षपदासाठी पक्षामार्फत सौ. सुषमा सुनिल साखरकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी पक्षाच्या इतर… pic.twitter.com/65x9ca4Aq9
— Praful Patel (@praful_patel) November 15, 2025
पश्चिम बंगालमध्येही भाजपचं सरकार
बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील टार्गेट पश्चिम बंगालला केलं आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधून गेलेली गंगा पश्चिम बंगालमध्ये मिळते असं म्हणत पटेल यांनी ममता बॅनर्जी यांना एक प्रकारे इशारा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची नीती आणि त्यांची दिलेली योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहे. तसा एक परिणाम आणि त्याचीही पावती आहे. पश्चिम बंगालमध्ये ही फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीमध्ये ही भारतीय जनता पार्टीचं तिथे नक्कीच चांगलं प्रदर्शन राहील. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही नक्कीच वाढ होईल किंबहुना सरकारही बनू शकेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा ते गंगासागर असा दिलेला नारा योग्य असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांनी सांगितलं.












