Indian engineer dies in Iraq during war | मागील काही दिवसांपासून आमिरेका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या तिन्ही देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसत आहे. त्यामुळे या युद्धाचा फटका अन्य देशांना बसताना दिसत आहे. यामध्ये भारताला देखील या युद्धाचा जोरदार फटका बसला आहे. कारण इराकमध्ये झालेल्या हल्ल्यात मुंबईतील (Mumbai) एका इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! राज्यात आज पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा
युद्धादरम्यान देवोनंदन प्रसाद सिंह यांचा दुर्दैवी मृत्यू
अमेरिका-इस्त्रायलने मिळून केलेल्या हल्ल्यानंतर इराण देश जोरदार प्रतित्युत्तर देताना दिसत आहे. इराणने अमेरिका-इस्त्रायलसह अमेरिकेचे तळ असलेल्या बाकी देशांमध्येही भीषण हल्ला करण्यास सुरूवात केली आहे. तर आता या युद्धादरम्यान इराकमधील एका तेल टँकवर झालेल्या हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील रहिवाशी देवोनंदन प्रसाद सिंह (वय 54) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
इंजिनियर देवोनंदन प्रसाद सिंह हे एमटी सेफसी विष्णू या मार्शल बेटांच्या ध्वजांकित अमेरिकेच्या मालकीच्या कच्चा तेलाच्या टँकरवर एडिशनल चीफ इंजिनियर म्हणून काम करत होते. तर दक्षिण भागातील खोर अल जुबैर बंदराजवळ हा टँकर शीप टू शीप कार्गो लोडिंग ऑपरेशन्स करत होता. यादरम्यान 11 मार्च 2026 रोजी या टँकरला हल्ल्याचा सामना करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकरवर भीषण हल्ला झाला आहे. ड्रोन आणि स्फोटकांनी भरलेल्या छोट्या बोटीच्या माध्यमातून टँकरवर हल्ला झाला. या हल्ल्यात देवानंद सिंह हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. देवोनंद सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर स्थानिक रहिवाशांकडून आणि नातेवाईकांकडून त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला जात आहे.
हल्ल्यादरम्यान जहाजावर होतो 15 भारतीय सदस्य
या हल्ल्यादरम्यान जहाजावर 15 भारतीय सदस्य, इतर राष्ट्रीयत्वांचे सदस्य आणि उर्वरित क्रू मेंबर्स होते. तर या सर्वांना इराकी कोस्ट गार्डने सुरक्षित बाहेर काढले आहे. तसेच देवोनंदन प्रसाद सिंह यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. तर सध्या त्यांचे पार्थिव भारतात आणले जात आहे.
दरम्यान, अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. तर या घटनेनंतर भारतीय सरकारकडून आणि संबंधित मंत्रालयाकडून कसून तपास केला जात आहे.












