Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताचा गॅस आणि तेल पुरवठा कधीही कमी होणार नाही; कतारचं मोठं आश्वासन
ताज्या बातम्या

मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताचा गॅस आणि तेल पुरवठा कधीही कमी होणार नाही; कतारचं मोठं आश्वासन

मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताचा गॅस आणि तेल पुरवठा कधीही कमी होणार नाही; कतारचं मोठं आश्वासन

Qatar Assures India : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कतारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, ते भारताला होणाऱ्या गॅस आणि तेलाच्या पुरवठ्यात (india lpg crisis) कोणतीही कपात होऊ देणार नाही. हे आश्वासन अशा वेळी आले आहे, जेव्हा जगभरातील ऊर्जा पुरवठ्याबाबत अनिश्चितता कायम आहे. दोहा इथं कतारचे ऊर्जा मंत्री, साद शेरिदा अल-काबी आणि भारताचे पेट्रोलियम मंत्री, हरदीप पुरी यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक आणि परस्पर संबंधांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीनंतर, भारतानं आशा व्यक्त केली की या प्रदेशात लवकरच शांतता आणि स्थैर्य परत येईल (geopolitical tensions).

कतारचं मोठं आश्वासन :

कतारनं भारताला आश्वासन दिलं (steady oil and gas supply) की ते एक विश्वसनीय ऊर्जा पुरवठादार म्हणून कायम राहतील. दोन्ही देशांनी जागतिक बाजारपेठेत स्थिरता राखण्यावर आणि ऊर्जा पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यावर भर दिला. त्यांनी सुरळीत पुरवठा साखळी राखण्याचं आणि अखंड आंतरराष्ट्रीय व्यापार सुनिश्चित करण्याचे आवाहनही केलं.

हेही वाचा : मिनाबमध्ये ठार झालेल्या 168 मुलांचे फोटो, दप्तरं आणि बूटासह इराण

हे भारतासाठी महत्त्वाचं का आहे? :

कतार हा भारताचा सर्वात मोठा एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) आणि एलपीजी पुरवठादार आहे. भारताच्या एलएनजी पुरवठ्यापैकी सुमारे 45% आणि एलपीजी पुरवठ्यापैकी 20% पुरवठा कतारकडून होतो. त्यामुळं कतारकडून मिळालेलं हे आश्वासन भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

ऊर्जा सुरक्षेवर भारताचं लक्ष :

कोणत्याही संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत सरकार विविध ऊर्जा स्रोतांवर सातत्यानं काम करत आहे. भारत आपल्या शेजारी देशांनाही मदत करत आहे. अलीकडेच श्रीलंकेला पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करण्यात आला, तर मॉरिशससोबतही एक करार होण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ऊर्जा क्षेत्रही मजबूत :

देशाची एकूण वीज निर्मिती क्षमता 531 गिगावॅटपेक्षा जास्त झाली असून, त्यात नवीकरणीय ऊर्जेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सरकार येत्या काही महिन्यांत नवीन प्रकल्प वेगानं सुरु करण्याची तयारी करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts