Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • गोविंदा कुटुंबातील मतभेद संपले; 14 वर्षांनंतर कृष्णा अभिषेक-सुनीता पुन्हा एकत्र
ताज्या बातम्या

गोविंदा कुटुंबातील मतभेद संपले; 14 वर्षांनंतर कृष्णा अभिषेक-सुनीता पुन्हा एकत्र

Govinda Family Reunion | सध्या कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि त्याची मामी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या 14 वर्षांपासून गोविंदाच्या कुटुंबात सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. नुकतेच सोशल मीडियावर काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये कृष्णा अभिषेक आणि काश्मिरा शाह (Kashmira Shah) हे दोघे मामी सुनीता आहुजा यांच्यासोबत खूप आनंदी दिसत आहेत. हा जुना वाद बाजूला सारून आता हे कुटुंब आनंदाने पुढे जाण्यास सज्ज झाले आहे. कुटुंबाचे हे पुनर्मिलन पाहून चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – ‘धुरंधर’ची दमदार कामगिरी; ‘बाहुबली’ अन् ‘पुष्पा’ला मागे टाकत रचला इतिहास

14 वर्षांनंतर मामी सुनीता आहुजा आणि भाचा कृष्णा अभिषेक आले एकत्र

बुधवारी (15 एप्रिल) मुंबईत ‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ सीझन 3 च्या सेटवर एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. अनेक वर्षांच्या वादानंतर कृष्णा अभिषेक आणि त्याची मामी सुनीता आहुजा अखेर एकत्र दिसले. यावेळी त्यांनी केवळ एकमेकांना मिठीच मारली नाही, तर पापाराझींसाठी पोझही दिली.

कृष्णा अभिषेकने स्वत: हा 14 वर्षांचा वाद आता संपला असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. कृष्णा अभिषेकने या भेटीला एक मोठे आश्चर्य म्हटले. त्याने सांगितले की, त्याची मामी या शोचा भाग असेल याची त्याला कल्पना नव्हती. त्याने सुनीता यांचे आभार मानत म्हटले की, त्यांनी या शोमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये पसरलेल्या सर्व अटकळी आणि अफवांना आम्ही आग लावून ते संपवले आहे. आज आम्ही एकत्र आलो आहोत, असं कृष्णाने म्हटलं आहे. तर आता गोविंदाच्या कुटुंबाचे हे पुनर्मिलन पाहून चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

गोविंदाच्या कुटुंबात का झाला होता वाद?

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर कृष्णाने केलेल्या विनोदांवर गोविंदाने आक्षेप घेतल्यावर कृष्णा आणि गोविंदाच्या कुटुंबातील मतभेद सुरू झाले होते. यानंतर, सुनीता आहुजा कृष्णाच्या कुटुंबापासून पूर्णपणे दूर झाल्या होत्या. काश्मिरा शाहने ‘पैशासाठी नाचणाऱ्या लोकांबद्दल’ ट्विट केल्यावर हा वाद अधिकच वाढला होता, ज्याला सुनीता यांनी गोविंदावर केलेला टोमणा समजलं होतं. गेल्या काही वर्षांत हे भांडण सार्वजनिक वक्तव्यांपर्यंत पोहोचले होते. 2024 च्या सुरुवातीला, सुनीताने कपिल शर्माच्या शोमधून अनुपस्थित राहण्याचे कारण म्हणून कृष्णा आणि काश्मिराच्या उपस्थितीचा उल्लेखही केला होता. दरम्यान, कृष्णा मागील काही काळापासून मुलाखतींच्या माध्यमातून समेट घडवण्याचा सतत प्रयत्न करत आहे आणि आता तो यशस्वी होताना दिसत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts