Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भारतानं केला ऐतिहासिक धावांचा पाठलाग; 10व्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिळवलं स्थान
Top News

भारतानं केला ऐतिहासिक धावांचा पाठलाग; 10व्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिळवलं स्थान

ICC U19 World Cup

ICC U19 World Cup : मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियानं झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय संघानं 4 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान अंडर-19 संघाविरुद्ध स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना खेळला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं फैसल शिनोजादा आणि उजैरुल्लाह नियाझाई यांच्या शतकांच्या मदतीनं 310 धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियानं केवळ 41.1 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठलं आणि ऐतिहासिक विजय नोंदवत स्पर्धेत इतिहास रचला. आरोन जॉर्जनं आपल्या शतकासह टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतीय संघाचा 10व्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश :

आयसीसी अंडर-19 विश्वचषकाचा हा 16 वा हंगाम आहे आणि टीम इंडियानं त्यांच्या सर्व सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत पोहोचून भारतीय संघानं स्पर्धेच्या 10 व्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता त्यांच्याकडे विजेतेपद जिंकण्याची उत्तम संधी आहे, जिथं त्यांचा सामना 6 फेब्रुवारी रोजी इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाशी होईल, ज्यांनी पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलं होतं.

टीम इंडियाचा विजय ऐतिहासिक :

भारतीय संघानं 2026 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानचा 7 विकेट्सनं पराभव केलाच नाही तर स्पर्धेत एक नवा इतिहासही रचला. अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील कोणत्याही संघानं केलेला हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. टीम इंडियानं 53 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठलं, ज्यामुळं 250 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य गाठताना अंडर-19 विश्वचषकातील हा दुसरा सर्वात जलद विजय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts