Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • कधीकाळी संध्याकाळी 5 वाजता सादर होत होता देशाचा अर्थसंकल्प; कधी आणि का बदलण्यात आली वेळ?
Top News

कधीकाळी संध्याकाळी 5 वाजता सादर होत होता देशाचा अर्थसंकल्प; कधी आणि का बदलण्यात आली वेळ?

High Speed Railway Corridors

Budget Timing Changed : भारतीय संसदीय इतिहासात, अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ राहिला नाही; तर त्यात वसाहतवादी वारशाचा त्याग आणि भारतीयत्वाचा स्वीकार देखील दिसून आला आहे. एक काळ असा होता की भारताचा अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे, परंतु आज ही परंपरा बदलली आहे. अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता का सादर केला जात असे आणि भारताला त्याची 70 वर्षांची जुनी परंपरा बदलण्यास भाग पाडणारी कारणं कोणती होती? चला जाणून घेऊया.

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता केला जात होता सादर :

ब्रिटिश राजवट आणि संध्याकाळी 5 वाजताचा संबंध. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून, भारतातील अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे. त्याची मुळे ब्रिटिश काळात आहेत. खरं तर, ब्रिटिश संसद (लंडन) आणि भारतीय संसदेच्या वेळेत 5:30 तासांचा फरक आहे. जेव्हा भारतात संध्याकाळी 5 वाजता होते तेव्हा लंडनमध्ये सकाळी 11:30 वाजता होते. भारतात अर्थसंकल्प सादर करताना लंडनमधील राजकारणी आणि व्यावसायिकांना त्यांच्या कामकाजाच्या वेळेत अर्थसंकल्प ऐकता यावा अशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची इच्छा होती.

1999 मध्ये जेव्हा 70 वर्षांची परंपरा बदलण्यात आली :

ही परंपरा मोडण्याचं श्रेय अटलबिहारी वाजपेयी सरकारला जातं. 1999 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादरीकरणाची वेळ सकाळी 11 वाजता निश्चित केली. यामागील तर्क असा होता की संध्याकाळी अर्थसंकल्प सादर केल्यानं रात्रभर बाजारपेठेत आणि माध्यमांमध्ये केवळ अटकळ निर्माण होईल, ज्यामुळं तपशीलवार विश्लेषणासाठी वेळ मिळणार नाही. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केल्यानं दिवसभर चर्चा आणि डेटा विश्लेषणासाठी पुरेसा वेळ मिळाला.

2017 मध्ये आणखी एक मोठा बदल :

2017 मध्ये आणखी एक मोठा बदल म्हणजे केवळ वेळच नाही तर अर्थसंकल्पाची तारीख देखील समाविष्ट होती. 2017 पर्यंत, फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जात असे, परंतु माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तो 1 फेब्रुवारी रोजी सादर केला. 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या आधी सर्व कायदेविषयक कामं आणि अर्थसंकल्पीय वाटप पूर्ण व्हावेत यासाठी हे करण्यात आले. तसंच, 92 वर्षे जुनं रेल्वे अर्थसंकल्प त्याच वर्षी सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts