188
कर्नाटक आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगांनी राहुल गांधींना ‘मतचोरी’च्या आरोपांवर शपथपत्र आणि पुरावे सादर करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मतदार यादीतील गोंधळ आणि दुहेरी मतदानाचा गंभीर आरोप केला होता. मात्र आयोगाच्या प्राथमिक चौकशीत त्यातील काही आरोप फेटाळण्यात आले आहेत. नियमांनुसार राहुल गांधींनी 10 दिवसांत शपथपत्र सादर करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल.









