Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • “नमाज अदा करायला घरात जागा नसेल तर संख्या कमी करा….”, योगी आदित्यनाथांचं खळबळजनक वक्तव्य, दिला थेट इशारा
Top News

“नमाज अदा करायला घरात जागा नसेल तर संख्या कमी करा….”, योगी आदित्यनाथांचं खळबळजनक वक्तव्य, दिला थेट इशारा

Yogi Adityanath | नुकतंच उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी रस्त्यावर नमाज (Namaz) अदा करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी गंभीर इशारा देखील दिला आहे. लखनौमधील एका कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज न अदा करण्याचे निर्देश दिले. तसेच जर तुमच्या घरात जागा नसेल तर संख्या कमी करा, असं खळबळजनक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

हेही वाचा – ईडी अॅक्शन मोडमध्ये! दिल्ली-गोव्यात छापेमारी केल्यानंतर ‘आप’ नेत्याला केली अटक, नेमकं प्रकरण काय?

रस्त्यावर नमाज अदा करण्याबाबत नेमकं काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

योगी आदित्यनाथ म्हणाले की, रस्ते हे चालण्यासाठी आहेत. रस्ता अडवण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. त्यामुळे रस्त्यावर नमाज अदा करू नका. तसेच जर तुमच्या घरात नमाज अदा करायला जागा नसेल तर संख्या नियंत्रणात ठेवा. जर तुमच्याकडे क्षमता नसेल तर तुम्ही संख्या का वाढवत आहात? असा थेट सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच जर घरात जागा कमी असेल तर पाळीपाळीने नमाज अदा करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

पुढे ते म्हणाले की, जर नमाज अदा करणे आवश्यक असेल तर तुम्ही ती पाळ्यांमध्ये अदा करावी. आम्ही तुम्हाला नमाज अदा करण्यास थांबवणार नाही, पण रस्त्यावर नमाज अदा करायची नाही. रस्ता हा चालण्यासाठी आहे, त्यामुळे आम्ही रस्त्यात अडथळा येऊ देणार नाही. सर्वांना सरकारचे नियम लागू होतात. त्यामुळे आम्ही रस्त्यावर अराजकता माजवू देणार नाही. लोक मला विचारतात की तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावर नमाज अदा केली जात नाही का? मी म्हणतो की, अजिबात केली जात नाही. रस्ते हे चालण्यासाठी आहेत आणि त्यांना रस्ता अडवण्याचा काय अधिकार आहे? जिथे जागा आहे तिथे जाऊन नमाज अदा करा.

जर तुम्ही प्रेमाने सहमत असाल तर ठीक आहे, नसाल तर आम्ही दुसरी पद्धत अवलंबू. तुमच्यासोबत संवाद साधणे हे आमचे काम आहे. तुम्ही संवादाला सहमत असाल तरच संवाद साधला जाईल नाहीतर संघर्षही बघा, असा थेट इशार योगी आदित्यनाथ यांनी दिला. तसेच बरेलीमध्ये लोकांनी आपले नशीब आजमावले त्यांनी आपली ताकद पाहिली आहे. जर तुम्हाला व्यवस्थेनुसार जगायचे असेल तर आपण नियम आणि कायद्यांचे पालन करायला सुरुवात केली पाहिजे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts