Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सोलापूरात बाळासाहेब सरवदे कुटुंबियांच्या सांत्वनापर अमित ठाकरेंना अश्रू अनावर
Top News

सोलापूरात बाळासाहेब सरवदे कुटुंबियांच्या सांत्वनापर अमित ठाकरेंना अश्रू अनावर

Balasaheb Sarwade Murder Case

Amit Thackeray Solapur emotional moment : सध्या राज्यात निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सोलापूरात अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून दोन जानेवारी रोजी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकार्‍याची हत्या करण्यात आली. आज मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सरवदे यांच्या रडणाऱ्या मुलीकडे पाहून अमित यांनी अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले, कधी कोणीही वारल्यावर मी राजकारण करत नाही, आज देखील मी फक्त सांत्वन करायला आलोय. आपल्या सगळ्या राजकारण्यांमधला एक माणूस जागा झाला पाहिजे अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – विकास कामाच्या श्रेयवादावरून भाजप-शिंदे आणि ठाकरे बंधु यांच्यात वादाची ठिणगी

आम्हाला निवडणूक नको, आम्ही माघार घेतो – अमित ठाकरे

मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियाची आज सोलापूरात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी संतप्त होत अमित ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली. अशा निवडणूका जिंकायच्या असतील तर आम्हाला निवडणूक नको, आम्ही माघार घेतो असे उद्वीग्न होत अमित ठाकरे म्हणाले. पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत सर्व ठीक होतं. मात्र आता खून करू लागले आहेत. समोरच्या पक्षातल्या लीडरकडे देखील मुलं-मुली आहेत. मी जसं बघितलं तसं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी याकडे बघावं. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपलं राज्य कुठे चालले आहे त्यांनी पाहिले पाहिजे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून दहा मिनिटे मला वेळ द्यावा

एक आई, दोन मुली आज अस्थि विसर्जन करून आले आहेत, ही कोणती परिस्थिती आहे? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे, बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून दहा मिनिटे मला वेळ द्यावा मी सर्व विषय त्यांच्यासमोर मांडेन असेही अमित ठाकरे म्हणाले. सोलापूरकर म्हणून विचार केला पाहिजे, कुठे नेऊन ठेवतोय आपलं शहर याच उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे.

तुम्ही जिंकले मज्जा करा, पण खुन करू नका

बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे. त्यांना सर्व परिस्थिती सांगणार आहे. आपलं राज्य असं असू शकत नाही. तुम्ही जिंकले मज्जा करा, पण खुन करू नका. त्यांच्या परिवाराची काळजी करू नका.. मला आर्थिक गोष्टी इथं करायच्या नाहीत. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेणार आहे. भाजपाची पातळी एवढी खाली गेली आहे. निवडणुकीसाठी ते खुन करताहेत.. अशा निवडणुका होत असतील तर नको अशा निवडणुका. आम्ही सर्व मागार घेतो तुम्ही जिंका. फडणवीस साहेबांना विनंती आहे त्यांनी एक दिवस प्रचार सोडून इकडे या असेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts