Amit Thackeray Solapur emotional moment : सध्या राज्यात निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सोलापूरात अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून दोन जानेवारी रोजी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकार्याची हत्या करण्यात आली. आज मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सरवदे यांच्या रडणाऱ्या मुलीकडे पाहून अमित यांनी अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले, कधी कोणीही वारल्यावर मी राजकारण करत नाही, आज देखील मी फक्त सांत्वन करायला आलोय. आपल्या सगळ्या राजकारण्यांमधला एक माणूस जागा झाला पाहिजे अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – विकास कामाच्या श्रेयवादावरून भाजप-शिंदे आणि ठाकरे बंधु यांच्यात वादाची ठिणगी
आम्हाला निवडणूक नको, आम्ही माघार घेतो – अमित ठाकरे
मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियाची आज सोलापूरात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी संतप्त होत अमित ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली. अशा निवडणूका जिंकायच्या असतील तर आम्हाला निवडणूक नको, आम्ही माघार घेतो असे उद्वीग्न होत अमित ठाकरे म्हणाले. पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत सर्व ठीक होतं. मात्र आता खून करू लागले आहेत. समोरच्या पक्षातल्या लीडरकडे देखील मुलं-मुली आहेत. मी जसं बघितलं तसं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी याकडे बघावं. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपलं राज्य कुठे चालले आहे त्यांनी पाहिले पाहिजे.
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
या दुःखद घटनेनंतर आज अमितजी ठाकरे यांनी सोलापूर येथील सरवदे कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.… pic.twitter.com/1CWlG7lqsa— MNVS Adhikrut – मनविसे अधिकृत (@MNVS_Adhikrut) January 4, 2026
फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून दहा मिनिटे मला वेळ द्यावा
एक आई, दोन मुली आज अस्थि विसर्जन करून आले आहेत, ही कोणती परिस्थिती आहे? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे, बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून दहा मिनिटे मला वेळ द्यावा मी सर्व विषय त्यांच्यासमोर मांडेन असेही अमित ठाकरे म्हणाले. सोलापूरकर म्हणून विचार केला पाहिजे, कुठे नेऊन ठेवतोय आपलं शहर याच उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे.
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
या दुःखद घटनेनंतर आज अमितजी ठाकरे यांनी सोलापूर येथील सरवदे कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.… pic.twitter.com/1CWlG7lqsa— MNVS Adhikrut – मनविसे अधिकृत (@MNVS_Adhikrut) January 4, 2026
तुम्ही जिंकले मज्जा करा, पण खुन करू नका
बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे. त्यांना सर्व परिस्थिती सांगणार आहे. आपलं राज्य असं असू शकत नाही. तुम्ही जिंकले मज्जा करा, पण खुन करू नका. त्यांच्या परिवाराची काळजी करू नका.. मला आर्थिक गोष्टी इथं करायच्या नाहीत. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेणार आहे. भाजपाची पातळी एवढी खाली गेली आहे. निवडणुकीसाठी ते खुन करताहेत.. अशा निवडणुका होत असतील तर नको अशा निवडणुका. आम्ही सर्व मागार घेतो तुम्ही जिंका. फडणवीस साहेबांना विनंती आहे त्यांनी एक दिवस प्रचार सोडून इकडे या असेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.












