Maharashtra Politics | राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या पक्षाच्या 15 ते 20 आमदारांनी शरद पवारांशी (Sharad Pawar) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. येत्या काळात राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! भारताच्या ‘ग्रीन सान्वी’ एलपीजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी केली पार; कधी पोहोचणार भारतात?
अजित पवार गटाचे 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात?
अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला जाहीरपणे विरोधा केला आहे. अशातच आता अजित पवारांच्या गटातील काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुखे शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटात मोठी खळबळ माजली आहे. पक्षातील अंतर्गत संघर्ष, सतत होणार वाद यामुळे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. आपले भविष्यात राजकीय अस्तित्व काय असेल? अशी चिंता बऱ्याच आमदारांना सतावत आहे. तसेच पक्षातील अंतर्गत वादामुळे मतदारसंघात आपला प्रभाव कमी होण्याची भीती आमदारांकडून व्यक्त केली जात आहे.
आमदारांनी गुप्तपणे घेतली शरद पवारांची भेट?
पक्षातील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील 15 ते 20 आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच काही आमदारांनी गुप्तपणे शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील अस्थिरतेमुळे काही आमदारांचा कल शरद पवारांकडे वळाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्यात राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बुधवारी (1 एप्रिल) रात्री अचानक दिल्ली (Delhi) दौऱ्यावर गेल्या आहेत. तर सुनेत्रा पवार काँग्रेस नेत्यांना आणि एनडीएच्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.












