Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला संबोधित करणार; काय बोलणार?
ताज्या बातम्या

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला संबोधित करणार; काय बोलणार?

नवी दिल्ली PM Narendra Modi : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी, रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यांच्या कार्यालयानं रविवारी ही घोषणा केली. ते कोणत्या विषयावर देशाला संबोधित करतील, याबद्दल पंतप्रधान कार्यालयानं कोणताही विशिष्ट तपशील दिलेला नाही. मात्र, पंतप्रधान महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा : “विरोधकांना सर्वत्र महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागेल,”; लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर अमित शाहांचा इशारा

विरोधकांवर टीका :

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्ष ‘दोषी’ असून महिलांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षाची ही भूमिका एक चूक असल्याचं म्हटलं आणि भविष्यात त्यांना याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला. सूत्रांनुसार, त्यांनी यावर जोर दिला की, विरोधी पक्षांचा महिलांप्रति नकारात्मक दृष्टिकोन आहे, हा संदेश देशातील प्रत्येक गावात पोहोचवला पाहिजे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदी असंही म्हणाले की, विरोधी पक्ष आता आपली भूमिका योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महिला आरक्षणावरुन लोकसभेत गदारोळ :

संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं राजकीय गोंधळ सुरुच आहे. मात्र, हे भाषण अशा वेळी झालं, जेव्हा संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयकाला लोकसभेत आवश्यक असलेलं दोन-तृतीयांश बहुमत मिळवता आलं नाही. या विधेयकाचा उद्देश संसद आणि राज्य विधानमंडळांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करणं, लोकसभेच्या जागांची संख्या 543 वरुन 850 पर्यंत वाढवणं आणि 2011 च्या जनगणनेच्या आधारे जागांची पुनर्रचना करणं हा होता. यावर 298 खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं, तर 230 खासदारांनी विरोधात मतदान केलं.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts