Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • भूकंपाने दणका; मणिपूर हादरला, ईशान्य राज्यांमधील लोकांनी सोडली घरे
Top News

भूकंपाने दणका; मणिपूर हादरला, ईशान्य राज्यांमधील लोकांनी सोडली घरे

Earthquake In Manipur | मणिपूरमध्ये (Manipur) 5.2 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) जाणवला आहे. मणिपूरसोबतच नागालँड (Nagaland), आसाम (Assam) आणि मेघालयमध्येही (Meghalaya) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 62 किलोमीटर खोल होता. या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे तात्काळ वृत्त समोर आलेले नाहीये.

हेही वाचा – मान्सूनपूर्वी मुंबईत पावसाची एन्ट्री? हवामान खात्याचा यलो अलर्ट, जोरदार वाऱ्याचा इशारा

मणिपूरमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप, लोकांनी घाबरून सोडली घरं

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, मंगळवारी पहाटे मणिपूरमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप 21 एप्रिल रोजी पहाटे 5.50 च्या सुमारास झाला आणि त्याचे केंद्र कामजोंग (Kamjong) येथे होते. लोकं गाढ झोपेत असतानाच भूकंप झाला आणि या भूकंपाचे धक्के एवढे जोरदार होते की लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. पहाटे झालेल्या या भूकंपाच्या धक्क्याने घाबरून लोक आपापल्या घरातून बाहेर पळू लागले आहेत.

आज पहाटे मणिपूरमध्ये मोठा भूकंप जाणवला. तर मणिपूरसोबत आसाम, नागालँड आणि मेघालयमध्ये देखील भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे मणिपूरसह नागालँड, आसाम आणि मेघालयमधील लोकांनी आपली घरे सोडून तिथून पळ काढला आहे. भूकंपाचे धक्के एवढे जास्त होते की लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, आत्तापर्यंत या भूकंपात कोणतीही जीवितहानी किना मालमत्तेची हानी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर मणिपूरचे प्रशासन सध्या या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोबतच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts