• Home
  • ताज्या बातम्या
  • आषाढ महिन्यात काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या धार्मिक आणि पारंपरिक महत्व एका क्लिकवर
संस्कृती

आषाढ महिन्यात काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या धार्मिक आणि पारंपरिक महत्व एका क्लिकवर

Ashadha Month

Ashadha Month: आषाढ महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. या महिन्यात काही गोष्टी करणे शुभ तर काही गोष्टी टाळणे हितावह मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अडचणींचा सामान करावा लागू शकतो, अशी मान्यता आहे. चला जाणून घेऊया, आषाढ महिन्यात नेमकं काय करावं आणि काय करू नये.

हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूची उपासना, वारी, एकादशी, गुरु पौर्णिमा यांसारखे महत्वाचे धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे अनेकजण या काळात सात्विक जीवनशैलीचा अवलंब करतात आणि काही गोष्टी करण्याचे टाळतात. धार्मिक श्रद्धा आणि परंपरेनुसार आषाढ महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, जे जाणून घेऊया.

हेही वाचा: आज अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांची भेट; दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग

आषाढ महिन्यात काय करावे?

आषाढ महिन्यात भगवान विष्णू, श्रीविठ्ठलाची पूजा करणे शुभ मानले जाते. “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते.

दानधर्म आणि सेवा

गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे पुण्यकारक मानले जाते. समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनालाही या महिन्यात विशेष महत्त्व दिले जाते.

सात्त्त्विक आहार घ्या

या काळात हलका, ताजा आणि सात्त्त्विक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

झाडे लावा

पावसाळ्याची सुरूवात असल्याने आषाढ महिन्यात वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पर्यावरण रक्षणासाठी हा उत्तम काळ आहे.

अध्यात्माकडे लक्ष द्या

धार्मिक ग्रंथांचे वाचन, नामस्मरण, भजन- कीर्तन आणि ध्यान यामुळे मन प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

आषाढ महिन्यात काय टाळावे?

शुभ कार्याची घाई करू नये

धार्मिक परंपरेनुसार अनेक ठिकाणी आषाढ महिन्यात विवाह, गृहप्रवेश, वास्तूशांती यांसारखी शुभ कार्ये टाळाली जातात. मात्र याबाबत स्थानिक परंपरा आणि ज्योतिषांचा सल्ला वेगवेगळा असू शकतो.

मांसाहार आणि मद्यपान टाळा

अनेक भाविक या महिन्यात मांसाहार, मद्यपान आणि तामसी आहारापासून दूर राहतात. यामागे धार्मिक श्रद्धेसह आरोग्याचाही विचार केला जातो.

निसर्गाचे नुकसान करू नका

अनावश्यकपणे झाडांची तोड, रोपांचे नुकसान किंवा पर्यावरणाला हानी पोहोचेल अशी कोणतीही कृती टाळावी.

पाण्याचा अपव्यय टाळा

पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. आषाढ महिन्यात जलसंवर्धनाचा संदेश दिला जातो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न करता त्याचा योग्य वापर करावा.

वाद-विवाद आणि नकारात्मक विचार टाळा

या महिन्यात शक्य तितके शांत राहणे, संयम राखणे आणि सकारात्मक विचार ठेवणे हितावह मानले जाते.

आषाढ महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व

आषाढ महिना भक्ती, संयम, सेवा आणि निसर्गाशी नाते दृढ करण्याचा काळ मानला जातो. पंढरपूरची आषाढी वारी, देवभक्ती आणि समाजातील एकात्मता यामुळे या महिन्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

टीप: हा लेख धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. विविध प्रदेशांतील रूढी आणि मान्यता वेगवेगळ्या असू शकतात.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts