• Home
  • ताज्या बातम्या
  • ईशान्य भारतातील राज्यांना भूकंपाचा जोरदार झटका; सुदैवानं जीवितहानी नाही
Top News

ईशान्य भारतातील राज्यांना भूकंपाचा जोरदार झटका; सुदैवानं जीवितहानी नाही

Earthquakes In Rajkot

Earthquake in Assam : अलिकडच्या काळात भारतासह जगभरात भूकंपांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये भूकंप इतके तीव्र झाले आहेत की हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळं भूकंपाची भीती वाढत आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे भारतातील दोन राज्यांना जोरदार भूकंपाचे धक्के बसले. अहवालानुसार, हे भूकंप ईशान्य भारतातील आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये झाले.

त्रिपुरामधील भूकंप :

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं यापूर्वी त्रिपुरातील भूकंपाची माहिती जाहीर केली आहे. संस्थेनं सोमवारी त्रिपुरातील गोमती इथं भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त दिलं आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 होती. अहवालानुसार, सोमवारी पहाटे 3:33 वाजता भूकंप झाला. भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 54 किलोमीटर खोलीवर होते.

आसाममधील भूकंप :

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सोमवारी पहाटे ईशान्य भारतातील आणखी एक राज्य आसाम देखील तीव्र भूकंपानं हादरल्याचं वृत्त दिलं आहे. संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी होती. आसाममधील मोरीगाव इथं पहाटे 4:17 वाजता हा भूकंप झाला. आसाममधील भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 50 किलोमीटर खाली होतं. (Earthquake in Assam)

भूकंप का होतात? (Earthquake in Assam) :

तुमच्या माहितीसाठी, आपल्या पृथ्वीखाली एकूण सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. माहितीनुसार, सर्व सात टेक्टोनिक प्लेट्स त्यांच्या संबंधित प्रदेशात फिरतात. मात्र, त्यांच्या रोटेशन दरम्यान, या टेक्टोनिक प्लेट्स अनेकदा फॉल्ट लाइनवर आदळतात. या टक्करमुळं घर्षण निर्माण होते, ज्यामुळं ऊर्जा बाहेर पडते. ही ऊर्जा सुटण्याचा मार्ग शोधते. म्हणूनच पृथ्वीवर भूकंप होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts