Breaking News :
ताज्या बातम्या

हा ‘जीवघेणा’ प्रवास संपेल का?

Chandrapur damaged bridge

चंद्रपूर जिल्ह्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाबा गावातील नागरिक आणि शाळकरी मुले सध्या जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. गावाला विभागणाऱ्या नाल्यावरचा पूल मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाला असून पावसाळ्यात या पुलावरून वाहणारे पाणी अपघाताचे संकट वाढवते. दररोज जिल्हा परिषदेतील लहान मुले या मार्गाने शाळेत ये-जा करतात, मात्र त्यांचा हा प्रवास जीवघेणा ठरतो आहे. स्थानिक नेते मनोज कोप्पावार यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts