• Home
  • राजकारण
  • लाचार आणि माकडासारखं उड्या मारणारं सरकार; हाकेंची घणाघाती टीका..
Top News

लाचार आणि माकडासारखं उड्या मारणारं सरकार; हाकेंची घणाघाती टीका..

Laxman Hake Criticizes Government

Laxman Hake Criticizes Government : ओबीसी समाजाचे आक्रमक नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसी नेते आणि सरकारवर जोरदार टीका केली. एवढं लाचार आणि माकडासारखं उड्या मारताना पहिल्यांना पाहिलं आहे. सरकार लाचार आहे, त्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) सारखं माकडासारखं उड्या मारत आहेत, अशी घणाघाती टीका हाके यांनी केली आहे.

विखेंनी घराण्याची इभ्रत पायधुळी मिळवली. केलेले पाप धुण्यासाठी प्रसाद लाड जरांगेंकडे आले. चंद्रकांत गायकवाड, प्रसाद लाड यांनी लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेतला. प्रसाद लाड यांची क्रिस्टल कंपनी या मधून सर्वच विभागात काम करतात. प्रसाद लाड कमिशन एजंट आहेत. जरांगेचे आंदोलन हे स्क्रिप्ट होतं. ठरवून एकदिवसाचे होते. यात मंत्री देखील सहभागी होते. थेट मंत्र्यांवरच लक्ष्मण हाके यांनी आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली. लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हटले की, सरकार अस्थिर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी होते. महाराष्ट्रातील मंत्री जरांगेला का भेटतात हे समजत नाही.

हेही वाचा –  मनोज जरांगे उन्हात, तर लक्ष्मण हाके ढेकळात उपोषणाला बसणार; आरक्षणाचा संघर्ष पेटणार

जरांगे हे बिहार चित्रपटातील रिल स्टार आहे – हाके

असंविधानिक मागण्या मान्य केल्या जातात. जरांगेचा अहंकार कुरवाळत आहे. मनोज जरांगे आणि सहकाऱ्यांनी चर्चेला बसावं. आज आंदोलन आम्ही सुरू करणार होतो. आंदोलनाची भाषा सरकारला कळते. मनोज जरांगे हे रिल स्टार आहेत. बिहार चित्रपटातील रिल स्टार आहेत. यादरम्यान लक्ष्मण हाके यांची जिभ घसरली, त्यांनी थेट प्रसाद लाड यांना हमखोर भाड खाऊ प्रसाद लाड म्हटले.

भाड खाणारा भाडं खाऊ प्रसाद लाड – हाके

विखे पाटील आणि प्रसाद लाडला ओबीसी जागा दाखवणार. भाड खाणारा भाडं खाऊ प्रसाद लाड.  प्रसाद लाड भाडं खाऊ. बेरोजगार पोरांच्या हितासाठी आमदारकीचा राजीनामा द्यायचा ना. ओबीसी आंदोलनाला सापत्न वागणूक देतात. मराठा समाजाला स्वतंत्र मंत्र्यालय स्थापन केले तर ४०० जातीसाठी मंत्रालय स्थापन करा. महाराष्ट्राचा ७/१२ तुमच्या नावावर आहेत का? असा ही मोठा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हटले की, ओबीसी मंत्री आणि नेत्यांना शुभेछा. मतदानातून लोक याला उत्तर देतील. मनोज जरांगे ला राजकारणाचे वेध लागले आहेत. प्रसाद लाडच्या मदतीने पक्ष स्थापन करून विजय थालपती व्हायचंय. पंकजा मुंडे, भुजबळ हे जरांगेच्या झुंडीला घाबरले आहेत, असाही मोठा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगेचे आंदोलन एक दिवसाची एकांकिका होती. गेल्या दोन वर्षात भाजपचा डी एन ए राहिला नाही. ओबीसी भाजप पासून दूर होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts