Deepak Prakash Nitish government minister : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, 20 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार यांनी 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 26 इतर नेत्यांमध्ये, चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे दीपक प्रकाश. दीपक प्रकाश हे आमदार किंवा एमएलसी नाहीत, तरीही त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. ते एनडीए घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) चं प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे आरएमएलचे नेते उपेंद्र कुशवाह त्यांचे वडील आहेत.
राजकारणात नवखे :
दीपक प्रकाश हे राजकारणात नवीन आहेत. मात्र, त्यांची राजकीय पार्श्वभूमी अगदी अलिकडची आहे. ते आरएमएल नेते उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र आहेत आणि परदेशातून शिक्षण घेऊन परतले आहेत. ते आमदार किंवा एमएलसी नसल्यामुळं, त्यांना सहा महिन्यांत राज्य विधिमंडळाच्या एका सभागृहाचं सदस्य व्हावं लागेल. विधानसभा निवडणुका आधीच झाल्या आहेत, ज्यामुळं त्यांना एमएलसी बनता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक प्रकाश यांचा जन्म 1989 मध्ये झाला आणि त्यांनी 2011 मध्ये सिक्कीम मणिपाल येथून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.
हे ही वाचा – Top News शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप गटाचे पदाधिकारी यांच्यात झाला राडा; वातावरण तापले
काय म्हणाले दिपक प्रकाश :
बिहारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, आरएलएम नेते दीपक प्रकाश म्हणाले, “मला ही संधी दिल्याबद्दल मी माझे नेते आणि वडील उपेंद्र कुशवाह यांचे आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे.”
VIDEO | Patna: After taking oath as Bihar Minister, RLM leader Deepak Prakash says, “I would like to thank my leader and father Upendra Kushwaha for giving me this opportunity, and I extend my gratitude to all the leaders and workers of the party. I am getting an opportunity to… pic.twitter.com/5SAImcKgU2
— Press Trust of India (@PTI_News) November 20, 2025
कुशवाहांनी खेळला मास्टरस्ट्रोक :
उपेंद्र कुशवाह यांनी या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली आहे. खरं तर, त्यांनी प्रथम त्यांच्या पत्नीसाठी तिकीट मिळवलं, जी जिंकली आणि आमदार बनली. आता, कुशवाहांच्या पक्षात चार आमदार आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला मंत्रीपद मिळवून दिलं आणि लवकरच त्यांना एमएलसी म्हणून नियुक्त करतील. निवडणूक तज्ञांचा असा विश्वास आहे की बिहार निवडणुका कुशवाहांसाठी फायदेशीर ठरल्या आहेत. त्यांच्या पत्नी आमदार झाल्या आणि त्यांचा मुलगा मंत्री झाला. सहा महिन्यांत त्यांचा मुलगाही आमदार होईल. शिवाय, विधानसभेत त्यांचे स्वतःचे चार आमदार असल्यानं कुशवाहांच्या पक्षाला आत्मविश्वास मिळेल.












