Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • कधी होणार भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे? रोहित-विराट उतरणार मैदानात
क्रीडा

कधी होणार भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे? रोहित-विराट उतरणार मैदानात

Rohit Sharma and Virat Kohli standing on the cricket field ahead of the India vs South Africa 2nd ODI match

India vs South Africa 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील वनडे मालिका सध्या सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघानं तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 17 धावांनी जिंकला आहे. यासह, टीम इंडियानं मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. आता सर्वांचं लक्ष मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर लागलं आहे. मालिकेतील दुसरा सामना कधी आणि कुठं खेळला जाईल असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

टीम इंडियानं पहिला सामना 17 धावांनी जिंकला :

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे सामना जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं 49.2 षटकांत 332 धावा केल्या, ज्यामुळं भारताला 17 धावांचा विजय मिळाला. भारतीय संघाच्या सर्वाधिक धावसंख्या असूनही, दक्षिण आफ्रिकेनं चांगला खेळ केला आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना जिवंत ठेवला.

हे ही वाचा : “मी फक्त एकच फॉरमॅट खेळत…” दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

दुसरा वनडे सामना 3 डिसेंबरला होईल :

आता मालिकेतील पुढील दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी रायपूर इथं खेळवला जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यांमध्ये फारसं अंतर नाही. याचा अर्थ असा की टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका लवकरच रांचीहून रायपूरला रवाना होतील. हा सामना बुधवारी होणार आहे. रायपूरमध्ये बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना होत आहे, त्यामुळं या सामन्याभोवती भरपूर उत्साह आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा उतरणार मैदानात :

रांची इथं खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीनं सामन्याभोवतीचा उत्साह आणखी वाढवला आहे. विराट कोहलीनं रांची कसोटीत शतक झळकावलं तर रोहित शर्मानंही आपलं अर्धशतक दमदारपणे पूर्ण केले. कर्णधार केएल राहुलनंही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts