Gold Import India: नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीसंदर्भात एक महत्वाचं आवाहन केलं आहे. यानंतर भारतात नेमकं सोनं कुठून येतं, दररोज किती खरेदी होतं आणि जर सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबली तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत, चला तर मग, जाणून घेऊया सविस्तर माहिती.
भारतामध्ये सोने हे केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित नसून ते परंपरा, गुंतवणूक आणि सुरक्षित संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. लग्नसमारंभ, सण आणि आर्थिक गुंतवणूक या सगळ्यात सोन्याला विशेष महत्व आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीबाबत एक महत्वाचं आवाहन केलं आहे. यानंतर भारतात सोनं नेमकं कुठून येतं, दररोज किती खरेदी होतं आणि जर सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबली तर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत.
भारतात सोनं कुठून येतं?
देशांतर्गत सोन्याचं उत्पादन अत्यंत कमी असल्यामुळे भारताला बहुतांश सोने आयात करावं लागतं. दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन सोन्याची मागणी असते, पण देशात खाणकाम खूपच मर्यादित आहे.
भारत सोनं मुख्यतः या देशांतून आयात करतो
स्वित्झर्लंड – सर्वात मोठा पुरवठादार
संयुक्त अरब अमिराती (UAE)
दक्षिण आफ्रिका
पेरू
हाँगकाँग आणि इतर देश
भारतात दररोज किती सोनं खरेदी होतं?
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतात दररोज साधारण २ ते २.२ टन सोनं खरेदी केलं जातं. याची किंमत हजारो कोटी रुपयांमध्ये जाते. यामध्ये मोठा हिस्सा दागिन्यांचा असतो, तर काही प्रमाणात नाणी आणि बिस्किटांच्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते.
सोन्याची मागणी का जास्त आहे?
भारतात दरवर्षी लाखो विवाहसोहळे होतात, जिथे सोनं अनिवार्य मानलं जातं
दिवाळी आणि अक्षय तृतीया सारख्या सणांना खरेदी वाढते
सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्वामुळे मागणी सतत कायम राहते
जर एक वर्ष सोनं खरेदीच केलं नाही तर काय होईल?
तज्ज्ञांच्या मते, जर भारतात एका वर्षासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात थांबली तर काय होईल.
सोन्याची आयात कमी होईल
परकीय चलनाचा (foreign exchange) मोठा खर्च वाचेल
व्यापार तुटीवर सकारात्मक परिणाम होईल
रुपयावरचा दबाव कमी होऊ शकतो
लोक शेअर्स, बाँड्स आणि बँक डिपॉझिट्ससारख्या पर्यायांकडे वळू शकतात.












