Rahul Gandhi on BJP : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या (Inflation and Rising Fuel Prices) मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून सरकार जनतेच्या खिशाला कात्री लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान मोदींना ‘इन्फ्लेशन मॅन मोदी’ किंवा ‘महागाई माणूस मोदी’ असे संबोधित करत, सरकारचा मुख्य अजेंडाच जनतेच्या खिशावर डल्ला मारणे असल्याची घणाघाती टीका केली.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, “महागाई माणूस मोदी पुन्हा हल्ला करत आहेत. ते पेट्रोल-डिझेलच्या किंमती किश्तींमध्ये वाढवतात, जेणेकरून जनतेच्या खिशातून शांतपणे पैसे काढता येतील.” त्यांनी सांगितले की, निवडणुका संपल्यावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे ८ रुपयांची एकूण वाढ झाली आहे आणि ही वाढ सातत्याने होत राहणार आहे.
राहुल गांधींनी दिली आर्थिक संकटाची पूर्वसूचना
राहुल गांधींनी आर्थिक संकटाची पूर्वसूचना देताना म्हटले की, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि देशांतर्गत महागाईमुळे आर्थिक तूफान येत आहे. पंतप्रधान मोदी निवडणुकींमध्ये व्यस्त होते आणि आता जनतेवर बोजा टाकत आहेत. “इन्फ्लेशन मॅन मोदींचे एकमेव काम हे आहे. निवडणुकीत मोठी आश्वासने देणे आणि उरलेल्या वेळात जनतेच्या खिशावर हल्ला करणे,” असे त्यांचे शब्द आहेत. त्यांनी युवक, शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचेही सांगितले.
महंगाई मानव मोदी का फिर से हमला।
पेट्रोल-डीज़ल के दाम किश्तों में बढ़ाते हैं – ताकि चुपके-चुपके आपकी जेब कटती रहे।
मैं महीनों से आर्थिक तूफान आने की बात कह रहा था। पर मोदी जी तब हमेशा की तरह चुनाव में व्यस्त थे – और चुनाव खत्म होते ही पेट्रोल-डीजल ₹8 महंगा कर दिया।
और, ये…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 25, 2026
काँग्रेसने केंद्र सरकारला विचारले प्रश्न
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असताना देशात महागाई का वाढत आहे? गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का वाढवल्या जात आहेत? सरकारने जनतेच्या हितासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने हल्ला चढवला आहे.राहुल गांधींनी रायबरेली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “कठीण काळ येत आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर आहेत, जनतेला परदेश यात्रा न करण्याचा सल्ला देत आहेत. पण ते स्वतः जगभर फिरत आहेत.” त्यांनी आर्थिक धोरणे अदानी-अंबानींसारख्या उद्योगपतींना फायदा पोहोचवणारी असल्याचा आरोपही केला.
महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसची रणनीती
सध्याच्या इंधन दरवाढीमागे जागतिक बाजारातील परिस्थिती, उत्पादन खर्च आणि महसुलाची गरज असल्याचे सूतोवाच केले जाते. मात्र, विरोधकांसाठी हा मुद्दा जनतेच्या दैनंदिन जीवनावरील बोजा दाखवणारा ठरला आहे.राहुल गांधींची ही टीका महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या रणनीतीचा भाग असल्याचे दिसते. देशातील अनेक राज्यांत इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून, याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमतींमध्ये सलग वाढ झाल्याने घरगुती बजेटवर दबाव वाढला आहे.












