लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.
Sign up to get update news about us. Don't be hasitate your email is safe.

अंतरवाली सराटीत झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका मांडली. “मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, कोणाच्याही शेतीचे, पिकांचे नुकसान करू नये,” असे आवाहन त्यांनी केले. मात्र, “आता सरकारला सुट्टी नाही, माघारही नाही,” असा थेट इशारा देत त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
गेल्या आंदोलनानंतर दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नाही, तसेच कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा: पटेल–तटकरे राष्ट्रवादीत नकोसे? रोहित पवारांचा ‘प्लॅन’ यशस्वी होतोय का?
मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 30 मेपर्यंत मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
जरांगे पाटलांनी आगामी आंदोलनाची तारीखवार रूपरेषा देखील जाहीर केली आहे:
“मी उपाशी मरेल पण समाजाशी बेईमानी करणार नाही,” असे भावनिक विधान करत त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर राज्यभर मोठे आंदोलन उभे राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या आंदोलनांनी राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम केला असून, आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.