• Home
  • देश
  • अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव, होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना वाढला धोका; 24 तासांत परिस्थिती कशी बदलली?
ताज्या बातम्या

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव, होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना वाढला धोका; 24 तासांत परिस्थिती कशी बदलली?

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव, होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना वाढला धोका; 24 तासांत परिस्थिती कशी बदलली?

Strait of Hormuz Tesnion : होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून, या मार्गातून प्रवास करणाऱ्या जहाजांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सुरुवातीला ही सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडली जाईल अशी आशा होती, परंतु आता तणाव आणि संघर्ष पुन्हा निर्माण झाले आहेत. गेल्या 24 तासांत, जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती झपाट्यानं बदलली आहे. शनिवारी, इराणनं दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केला, ज्यामुळं त्यांना परतावं लागलं.

हेही वाचा : टीएमसीला बंगालच्या मुलींनी आमदार-खासदार व्हावे असं वाटत नाही, कारण…, पंतप्रधान

होर्मुझची सामुद्रधुनी उघडल्यानंतर इतक्या लवकर बंद का झाली? :

अमेरिकेनं इराणच्या बंदरांवर घातलेल्या नाकेबंदीनंतर, जेव्हा इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडल्याची घोषणा केली, तेव्हा संपूर्ण जगानं सुटकेचा निःश्वास टाकला. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असल्याचं म्हटलं होतं. परिणामी, तेलाच्या किमती घसरल्या आणि या प्रदेशात अडकलेल्या जहाजांना दिलासा मिळाला. मात्र, हा दिलासा अल्पकाळ टिकला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की, इराणसोबत 100% करार पूर्ण झाल्यानंतरच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अमेरिकेची नाकेबंदी संपुष्टात येईल.

इराणी गनबोट्सकडून भारतीय जहाजांवर गोळीबार :

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळं होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत पुन्हा एकदा शंका निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सनं (IRGC) होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याची घोषणा केली. त्यांनी इशारा दिला की, या भागात प्रवेश करणाऱ्या जहाजांना शत्रूशी संगनमत केल्याचं मानलं जाईल आणि त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो. इतकंच नाही तर, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन भारतीय जहाजांना मागे फिरण्यास भाग पाडलं गेलं आणि त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयानं दिल्लीतील इराणी राजदूतांना बोलावले.

मुज्तबा यांचं वक्तव्यही समोर :

इराणी गनबोट्स जहाजांवर गोळीबार करत असल्याचा आरोप होत आहे. इराणनं स्पष्ट केलं आहे की, जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरु राहील, तोपर्यंत या मार्गातून व्यापारी जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध राहतील. इराणचे नवे सर्वोच्च नेते, अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी शनिवारी एक आव्हानपूर्ण निवेदन जारी केलं, ज्यात त्यांनी म्हटलं आहे की नौदल “आपल्या शत्रूंना जबरदस्त पराभव देण्यास सज्ज आहे.”

युद्धविराम 21 एप्रिल रोजी संपणार :

दोन्ही देशांमधील सर्वात मोठा वाद इराणचा अणुकार्यक्रम आणि समृद्ध युरेनियमच्या साठ्यावरुन आहे. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की अमेरिका इराणचं समृद्ध युरेनियम जप्त करेल. दोन्ही देशांमधील युद्धविराम 21 एप्रिल रोजी संपणार असून, तो वाढवता येणार नाही असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. दरम्यान, सूत्रांनी असे संकेत दिले आहेत की दोन्ही बाजूंमध्ये चर्चेची दुसरी फेरी सोमवारी इस्लामाबादमध्ये होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts