• Home
  • राजकारण
  • Samruddhi Highway farmers protest : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर 7 किलोमीटर लांब ट्राफिक जाम; शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रोखला
Top News

Samruddhi Highway farmers protest : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर 7 किलोमीटर लांब ट्राफिक जाम; शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रोखला

website 5 4

Samruddhi Highway farmers protest : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरु आहे. बुधवारी शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग दोन तास रोखला. संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक दोन तास पूर्णपणे विस्कळीत केली. आंदोलकांनी सरकारला इशारा दिला आहे की, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी निर्णायक लढाई आहे.

शेतकऱ्यांचा सरकारला इशारा :

स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर म्हणाले की, जर सरकारनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही आणि सामान्य कर्जमाफीबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर ते राज्यभर मोठं शेतकरी आंदोलन होईल. आम्ही सरकारला इशारा दिला आहे. या आंदोलनामुळं महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि पोलीस प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन संपणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन :

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारनं पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक भूमिका घेतली आहे. आंदोलनापूर्वीच सरकारनं बैठक बोलावली होती. चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बच्चू कडू यांनी हे मान्य केलं. त्यानंतर त्यांनी मध्यरात्री मला मेसेज करुन सांगितलं की ते बैठकीला येऊ शकत नाहीत. बावनकुळे यांनी आज त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. आता आपल्याला त्यावर चर्चा करून रोडमॅप तयार करण्याची गरज आहे. या आंदोलनामुळं रस्ते अडवले जातात, ज्यामुळं लोकांची गैरसोय होते.

योग्य वेळी शेतकऱ्यांना पैसे देऊ (Samruddhi Highway farmers protest)

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, सरकारची स्पष्ट भूमिका आहे. यासाठी आम्ही एक समितीही स्थापन केली आहे. आज ज्या शेतकऱ्यांची पिकं नष्ट झाली आहेत आणि जे संकटात आहेत त्यांना मदत करणं हे प्राधान्य आहे. आम्ही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. कर्जमाफीचे पैसे प्रथम बँकांकडे जातील; ते थेट शेतकऱ्यांकडे जाणार नाहीत. त्यामुळं बँकांना फायदा होण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत करणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही कर्जमाफीच्या आश्वासनापासून मागे हटत नाही आहोत. योग्य वेळी कर्जमाफी केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts