Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही चालू;’ अर्ज माघारीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Top News

‘लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही चालू;’ अर्ज माघारीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut Political Statement

Sanjay Raut attack government nomination withdrawal : सरकारी यंत्रणेचा संपूर्ण गैरवापर सुरू आहे. लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही सुरू आहे, उमेदवारी अर्ज माघारीवरून अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजया राऊत यांनी महायुती सरकारवर केली आहे. राऊत यांनी आपल्या एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट करत, भाजप शासित महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

हेही वाचा – “काही जण माझ्या नावाने बोंबाबोम करत होते;” नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

“रात्री कितीही वाजेपर्यंत माघारीचा अर्ज आणून दिल्यास तो तीन वाजेच्या आत आणून दिलेला आहे, असे समजून माघार नोंदवावी, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या प्रक्रियेत असलेला माझा एक मित्र आत्ताच मला फोनवर बोलला की, त्याने असे करणे चुकीचे होईल, असे म्हणाल्यावर त्याला लगेच पालकमंत्र्यांचा फोन आला आणि आमचे स्थानिक आमदार काय सांगतात त्याप्रमाणे करा, अशी धमकी बजा विनंती त्याला करण्यात आली,” असं संजय राऊत म्हणाले.

“एका बाजूला आपल्या लोकांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी समोरच्या उमेदवाराना ५-५ कोटी द्यायचे व माघार घ्यायला लावायची आणि दुसऱ्या बाजूला हे असे उद्योग करायचे. लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही चालू आहे. एकदिवस इकडे नेपाळ आणि बांगलादेश प्रमाणे जन उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,” असा हल्ला संजय राऊत यांनी सरकारवर केलाय.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts