Nitesh Rane attack on Congress : आज प्रत्येक पक्षाची हीच भावना आहे की, दादांसारखा एक ताकदीचा नेता आपल्याकडून निघून गेल्यामुळे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे. म्हणून बारामती पोटनिवडणूक (Baramati By-election) बिनविरोध व्हावी, ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण काँग्रेसच्या (Congress) निर्लज्जपणाला काही टोकच नाही, असा हल्लाबोल मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांच्यावर केला आहे.
हेही वाचा – बारामतीतील अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाला अजित पवार यांचे नाव दिलेला जीआर अखेर रद्द
त्या चौकटीत जर काँग्रेसवाले बसत नसतील
शेवटी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. अजित दादांसारखा एक मोठा नेता जेव्हा आपल्यातून निघून गेला, तर सगळ्यांनी बिनविरोध ती सीट करणे ही एक भावना आहे. त्या पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता त्या चौकटीत जर काँग्रेसवाले बसत नसतील, तर ते त्यांच्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे प्रदर्शन करतायेत, असे राणे म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार
हिंदू नवीन वर्षाच्या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला अजून ताकद देणे, सक्षम करणे आणि पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठेवणे ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुख्य संकल्पना आहे. आणि म्हणून आज सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये हे नवीन वाहनं जे आम्ही जिल्हा नियोजनाच्या निधीच्या माध्यमातून दिलेले आहेत, त्याचे हस्तांतरण गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले, आल्याचे राणे म्हणाले.
आंबा, काजू नुकसान भरपाई देण्यास सरकार सज्ज
जसं आंबा आणि काजू संदर्भात गेल्या तीन दिवसांपूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री फडमवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली. निसर्गामुळे जे काही नुकसान होतंय, प्रामुख्याने आंबा-काजू या संदर्भात, अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसान भरपाई म्हणा किंवा सरकारची मदत म्हणा, आम्ही देण्यासाठी सज्ज आहोत. त्या पद्धतीची तयारी सरकार म्हणून आम्ही करतोय, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.












