Maharashtra SSC and HSC Exam Fee Refund Announcement: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी पूर्णपणे परत केली जाणार आहे.
या निर्णयाचा फायदा अनेक जिल्ह्यातील तालुक्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परीक्षा फी परत मिळवण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून, ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
हेही वाचा: नाव बदललं ‘दिव्यांग’, पण वास्तव तसंच; अपंगांच्या व्यथा अजूनही कागदावरच
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये परीक्षेस बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांना ही फी परत दिली जाईल. ही रक्कम NEFT किंवा RTGS च्या माध्यमातून थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू
यासाठी संबंधित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या लॉगिनद्वारे पात्र विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य मंडळाच्या पोर्टलवर ही प्रक्रिया 20 एप्रिल 2026 ते 2 मे 2026 या कालावधीत उपलब्ध असेल.
कोणती माहिती भरावी लागेल?
विद्यार्थ्यांची खालील माहिती भरावी लागणार आहे:
बैठक क्रमांक
विद्यार्थ्याचे नाव
बँक खाते क्रमांक
IFSC कोड
आधार क्रमांक
ही माहिती भरल्यानंतर शाळा किंवा महाविद्यालयाने विद्यार्थ्याला “पात्र” असा शेरा द्यावा लागेल.
पैसे कधी मिळणार?
पात्र विद्यार्थ्यांची माहिती तपासल्यानंतर मंडळाकडून NEFT किंवा RTGS द्वारे थेट बँक खात्यात फीची रक्कम जमा केली जाणार आहे.









