Top News

मुंबईत मासे कापायला बंदी! BMC Vs कोळी बांधव वाद पेटला

Mumbai fish cutting ban

Mumbai fish cutting ban : मुंबई महानगरपालिकेने मासे कापण्यावर आणि स्वच्छ करण्यावर लावलेल्या बंदीमुळे मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले असून या निर्णयाने कोळी समाज आणि प्रशासन यांच्यात थेट संघर्ष सुरू झाला आहे. मुंबई ही कोळी बांधवांची आहे आणि त्यांच्या मासेमारीच्या व्यवसायाला अशा प्रकारे चाप लावणे म्हणजे त्यांच्या पोटावर पाय देण्यासारखे आहे असा संताप कोळी महिलांनी व्यक्त केला आहे. वाकोला परिसरातील धोबीघाट मासळी बाजारात जेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मासे कापण्यास मज्जाव केला. तेव्हापासून या वादाला तोंड फुटले आहे. पालिकेचे म्हणणे आहे की मासे कापल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर घाण साचते आणि दुर्गंधी पसरते ज्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र कोळी विक्रेत्यांचे म्हणणे असे आहे की जर आम्ही मासे कापून दिले नाहीत तर आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणताही ग्राहक अख्खा मासा घरी घेऊन जाणार नाही आणि पर्यायाने आमचा धंदा पूर्णपणे ठप्प होईल.

हेही वाचा – बंगाल हादरले सुवेंदू अधीकारी यांच्या पीए ची हत्या: अभिषेक शर्मावर संशय

या वादात आता राजकीय पक्षांनीही उडी घेतली असून हा विषय अस्मितेचा बनला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या निर्णयाचा तीव्र निषेध केला असून प्रशासनाला कोळी बांधवांविरुद्ध कारवाई न करण्याचा इशारा दिला आहे. कोळीवाडे आणि मासळी बाजार ही मुंबईची संस्कृती आहे आणि ती जपण्याऐवजी प्रशासन बिल्डरांच्या फायद्यासाठी कोळी समाजाला इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोपही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. ज्यांना माशांच्या वासाचा त्रास होतो त्यांनी मासे खाणाऱ्यांच्या मुंबईत राहू नये अशा कडक शब्दांत कोळी महिलांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. केवळ स्वच्छता हा निकष लावून जर पारंपरिक व्यवसायावर बंदी घातली जाणार असेल तर मटण आणि चिकन विक्रीच्या बाबतीतही पालिका असेच नियम लावणार का असा सवाल आता विचारला जात आहे.

कोळी संघटनांनी प्रशासनाचा दावा काढला

दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत असून त्यांनी स्पष्ट केले आहे की बाजारात स्वच्छतेचे नियम पाळणे अनिवार्य आहे. मासे कापल्यानंतर उरलेला कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता तिथेच टाकला जातो ज्यामुळे नाले तुंबतात आणि पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते. मात्र कोळी संघटनांनी प्रशासनाचा हा दावा खोडून काढला असून त्यांनी कचरा उचलण्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईतील मासळी बाजारांमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून कोळी बांधवांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे. प्रशासनाने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर संपूर्ण मुंबईत मासळी विक्री बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा समन्वय समितीने दिला आहे.

मुंबईची ही पारंपरिक बाजारपेठ

हा वाद केवळ स्वच्छतेचा नसून तो एका समाजाच्या अस्तित्वाचा आणि रोजगाराचा बनला असल्याने राज्य सरकारला यात मध्यस्थी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोळी समाजाच्या महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाचा आणि घराचा खर्च याच व्यवसायावर चालत असल्याचे सांगत सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक राजकीय रंग घेण्याची चिन्हे असून मुंबईची ही पारंपरिक बाजारपेठ वाचवण्यासाठी आता सर्व स्तरांतून आवाज उठवला जात आहे.

थेट बंदीचा मार्ग स्वीकारल्याने संतापाची लाट

या वादाचा परिणाम थेट सामान्य ग्राहकांवरही होत असून बाजारात मासे मिळणे कठीण झाले आहे. मासे कापण्यावर बंदी आल्याने ग्राहकांनीही पाठ फिरवली असून याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमार कुटुंबांना बसत आहे. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून आधुनिक फिश मार्केट किंवा कचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याऐवजी थेट बंदीचा मार्ग स्वीकारल्याने जनमानसात संतापाची लाट आहे. जोपर्यंत प्रशासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा पवित्रा कोळी समाजाने घेतला असून मुंबईच्या किनारपट्टीवर सध्या संघर्षाची ठिणगी पडली आहे.

मासे कापण्यावर बंदी घालणे हा कोळी संस्कृतीवर घाला

मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध अधिक टोकदार झाले आहे. किशोरी पेडणेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत “प्रशासन कोळी समाजावर विनाकारण दबाव टाकत आहे” अशी टीका केली असून, मासे कापण्यावर बंदी घालणे हा कोळी संस्कृतीवर घाला असल्याचा आरोप केला आहे. ज्यांना माशांच्या वासाचा त्रास होतो, त्यांनी कोळी बांधवांच्या मुंबईत राहू नये, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले असून, कोळी समाजाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईला स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त करणे हे प्रशासनाचे कर्तव्य

या टीकेला उत्तर देताना महापौर रितू तावडे यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर भर दिला असून, “मुंबईला स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे” अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी पेडणेकर यांच्यावर पलटवार करताना म्हटले की, विरोधी पक्षनेते केवळ राजकीय हेतूने कोळी समाजाची दिशाभूल करत आहेत. पालिकेच्या मुख्यालयात महापौरांच्या खुर्चीवरून झालेल्या अलीकडच्या वादानंतर मासे कापण्याच्या या प्रकरणाने दोन्ही नेत्यांमधील दरी आणखी वाढवली आहे. या वादाचे पडसाद आता महापालिकेच्या आगामी कामकाजात आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts