Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतरमंतरवर गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आम्ररण उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांनी शनिवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर त्यांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक महत्वपूर्ण संदेश प्रसिद्ध करत काही अटी पूर्ण झाल्यास आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.
सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी आपल्या संदेशात केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख अटी मांडल्या आहेत. त्यांच्या मते, या अटींवर सकारात्मक निर्णय झाल्यास ते उपोषण समाप्त करण्यास तयार आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या तीन अटी आहेत.
हेही वाचा: आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू; अर्थव्यवस्था, रोजगार आणि कृषी सुधारणा यांवर सरकारचा भर
या अटी आता केंद्र सरकार मान्य करणार का?
१- नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील त्रुटींसाठी केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली आहे.
२ जर मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे.
३ जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.
WHEN WILL I END THE FAST….!
Not withstanding my health my fast continues till after the Sansad Chalo March, and will be broken only under the following circumstances… pic.twitter.com/kaOGx2Nk4T— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 20, 2026
याशिवाय, सोनम वांगचूक यांनी आपण सध्या सफदरजंग रुग्णालयात असल्याचे सांगत, आपल्याला अनधिकृतपणे ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयात आपल्या हालचालींवर, संवादावर आणि इतरांशी संपर्क साधण्यावर निर्बंध घालण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, सोनम वांगचूक यांनी मांडलेल्या अटींवर केंद्र सरकारची काय भूमिका असेल, याकडे राजकीय वर्तुळासह देशभराचे लक्ष लागले आहे.









