Farmer Protest Maharashtra: कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी काढलेले शेतकरी आंदोलन आज चिघळले. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंतच्या मोर्चादरम्यान पोलिसांनी कारवाई करत विनायक राऊत, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
या मोर्चाचे नेतृत्व विनायक राऊत(Vinayak Raut), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मात्र मोर्चा काढू नये म्हणून पोलिसांनी आधीच संबंधित नेत्यांना नोटीस बजावली होती. तरीही मोर्चा पुढे नेण्यात आला.
हेही वाचा: अरेरे! चक्क गायकावर पैशांचा पाऊस; व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष
वर्षा बंगल्याच्या दिशेने मोर्चा पोहोचताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलन आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचेही समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
शेतकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात
या कारवाईत प्रमुख नेते राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर यांच्यासह अनेक शेतकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे.
प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.












