Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • लोकसभेत आदित्य ठाकरेंवरुन भाजपा-ठाकरे गटाचे खासदार आमनेसामने; नेमकं काय घडलं?
Top News

लोकसभेत आदित्य ठाकरेंवरुन भाजपा-ठाकरे गटाचे खासदार आमनेसामने; नेमकं काय घडलं?

लोकसभेत आदित्य ठाकरेंवरुन भाजपा-ठाकरे गटाचे खासदार आमनेसामने; नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली Delimitation Bill Controversy : गुरुवारी संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर जोरदार चर्चा झाली (women reservation). काही वेळा परिस्थिती चिघळली, ज्यामुळं थेट आरोप-प्रत्यारोप झाले. अशीच एक घटना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत विधेयकावर भाषण देत असताना घडली. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, सावंत यांनी भाजपा नेत्यांशी संबंधित वादग्रस्त मुद्द्यांचा उल्लेख केला. त्यांनी कुलदीप सिंह सेंगर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांची नावं घेतली. यावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पुढाकार घेत आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित वादाचा उल्लेख केला. परिस्थिती चिघळली आणि अध्यक्षांना हस्तक्षेप करुन ती शांत करावी लागली.

हेही वाचा : सीमांकनानंतर दक्षिण भारतातील राज्यांना किती जागा मिळतील? गृहमंत्री आमित शाह

कोण काय म्हणालं :

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत बोलू लागल्यावर चर्चा अधिकच तापली. पंतप्रधानांनंतर बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजतो, असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर, भाषणाच्या मध्यातच त्यांनी भाजपाशी संबंधित वादग्रस्त मुद्द्यांकडे मोर्चा वळवला. अध्यक्षांना उद्देशून ते म्हणाले, “कुलदीप सेंगर कोण आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत हे आपण विसरता कामा नये. तसेच, बृजभूषण शरण सिंह कोण आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे.”

सभागृहात घोषणाबाजी :

खासदारांनी ही नावं उच्चारताच सभागृहातील भाजपा सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केली. परिस्थिती शांत करण्यासाठी, अध्यक्षांनी हस्तक्षेप करत संसदेत कोणावरही असे आरोप करणं अनुचित असल्याचं सांगितले. दरम्यान, या गदारोळातही अरविंद सावंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी सडेतोड टिप्पणी केली, “बलात्कारी इतके गोंडस असतात का?” या वक्तव्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. गोड्डाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिलं, “जर ते कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबद्दल बोलत असतील, तर आदित्य ठाकरे यांचंही नाव घेतलं जाईल. त्यांनीही ‘नायिके’ची हत्या केली होती.” यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक सुरु राहिली. पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी ही वक्तव्यं नोंदीचा भाग नसतील असं सांगून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती शांत झाली.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts